शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

UP Police Constable recruitment exam



UP Police Constable recruitment exam

Up Police Constable Exam City Slip 2024 slip has been released for UP Police Constable recruitment exam. The exam is scheduled to be held on February 17 and 18. Registered candidates can know their exam city by following the steps given below.

Uttar Pradesh Police Recruitment and Promotion Board has released the recruitment exam city information slip for direct recruitment to the post of UP Police Constable (Civil Police) – 2023. All the candidates who had applied for this recruitment can download the exam city slip from the official website uppbpb.gov.in.

UP Police Constable (Civil Police) recruitment exam is scheduled to be held in two shifts on 17th and 18th February. The first shift will be from 10.00 am to 12.00 noon and the second shift will be from 3.00 pm to 5.00 pm. Admit card will be made available for downloading from February 13, 2024.
The recruitment drive aims to fill a total of 60,244 male and female civilian constable posts through the combined recruitment examination.

Selection Process

Candidates will be selected on the basis of their performance in the OMR based examination, after which the candidates will also have to go through the stages of document verification, physical standard test and a physical interview (if required).

Steps to download UP Police Constable Exam City Slip

Visit the official website uppbpb.gov.in.

On the homepage, click on the Examination City Slip link for the post of Constable (Civil Police) – 2023.

Enter your login details and submit.

Check and download exam city slip.

Take a printout of it for future reference.

Exploring Truman Capote's Literary Universe: A Guide to Must-Read Books

 Exploring Truman Capote's Literary Universe: A Guide to Must-Read Books



Embarking on a literary journey through the captivating works of Truman Capote is akin to stepping into a world of intrigue, wit, and profound insight. For enthusiasts and scholars alike, delving into books about Truman Capote is an enriching experience that offers a glimpse into the mind of a literary genius. In this guide, we'll navigate through some essential reads that shed light on Capote's life, works, and enduring legacy.


Unraveling Truman Capote's Legacy:

Books about Truman Capote serve as portals into the rich tapestry of his literary legacy. From timeless classics to insightful biographies, each book offers a unique perspective on the life and works of this iconic writer. Whether you're a seasoned admirer or a newcomer to Capote's oeuvre, there's a wealth of material waiting to be explored.


Exploring Capote's Masterpieces:

At the heart of "Books about Truman Capote" are his masterpieces, which continue to captivate readers with their timeless charm and enduring relevance. Works such as "Breakfast at Tiffany's" and "In Cold Blood" showcase Capote's versatility as a writer, spanning the realms of fiction and non-fiction with equal brilliance. Through vivid characters, evocative settings, and compelling narratives, these books offer a glimpse into Capote's unique vision of the world.


Diving into Capote's Creative Process:

For aspiring writers and literature enthusiasts, books about Truman Capote provide invaluable insights into his creative process and the craft of storytelling. Biographies and memoirs such as "Truman Capote: In Which Various Friends, Enemies, Acquaintances, and Detractors Recall His Turbulent Career" by George Plimpton offer a behind-the-scenes look at Capote's life, inspirations, and the challenges he faced as a writer. By delving into Capote's struggles and triumphs, readers can gain a deeper appreciation for the art of writing and the dedication required to succeed in the literary world.


Examining Capote's Cultural Impact:

Beyond his literary achievements, books about Truman Capote also explore his enduring cultural impact and influence on popular culture. Critically acclaimed works like "Capote, Hollywood, and the Making of In Cold Blood" by Jonathan Kirshner delve into the adaptation of Capote's seminal work for the silver screen, highlighting the intersections between literature, film, and society. Through insightful analysis and commentary, these books offer a fresh perspective on Capote's legacy and his ongoing relevance in the modern world.


Celebrating Capote's Enduring Appeal:

In the realm of literature, few names evoke as much fascination and admiration as Truman Capote. His wit, charm, and unmatched storytelling prowess continue to captivate audiences around the world, making "Books about Truman Capote" essential reads for anyone with a love for literature. Whether you're drawn to his iconic characters, his incisive observations on society, or his unparalleled prose style, there's something in Capote's work that resonates with readers of all ages and backgrounds.

As we conclude our exploration of "Books about Truman Capote," it's clear that his legacy remains as vibrant and compelling as ever. From his groundbreaking novels to his enduring cultural influence, Capote's impact on literature and popular culture is undeniable. Whether you're a die-hard fan or a curious newcomer, there's no better time to immerse yourself in the world of Truman Capote and discover the magic of his timeless tales. So, pick up a book, settle in, and prepare to be transported to a world where the line between fiction and reality blurs, and the power of storytelling knows no bounds.

.....................................

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

अनेक रंगरुपे बदलली तरी छत्र्याची जादू आजही कायम

अनेक रंगरुपे बदलली तरी छत्र्याची जादू आजही कायम 
Magic of Umbrella

महाड पाऊस सुरु झाला की पहिली आठवण होते ती छत्रीची .आणि मग कपाटात, अडगळीच्या ठिकाणी असलेल्या छत्रीचा शोध सुरु होतो.नाहितर नविन छत्र्यांची खरेदी होते.आजोबांची लाकडी दांड्यांची लांब छत्री असो नाहितर पर्समध्ये राहणारी आईताईची इवलीशी छत्री असो.छत्र्यांची अनेक रंगरुपे काळानुसार बदलत राहिली.पावसात गरागरा छत्री फिरवणारी बच्चे कंपनी आणि चित्रपटातील छत्रीतील गुणगुणाविशी वाटणारी गाणी याचा आनंद काही वेगळाच. डोक्यावर केळीचे नाहितर सागाचे पान घेत सुरु झालेला या छत्रीचा प्रवास आणि रंगीबेरंगी छत्र्याची जादू आजही कायम आहे. 




 ऊन व पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर होत असला तरी तिची खरी निकड भासते ती पावसाऴ्यात.वापरण्यास व सांभाळण्यास सोयीची असलेली ही छत्री अनेक रंगरुपात बाजारात मिळू लागली आहे.हमखास विसरली जाणारी अशी ही वस्तु असली तरी ती लोकांना फार आवडते.व्यक्तिगत उपयोगा बरोबरच, समुद्रकिनारी, उपाहारगृहात सावलीसाठी असलेल्या मोठ्या छत्र्या लक्ष वेधून घेतात.बघता बघता हॉटेलमधील मॉकटेल, कॉकटेल ही पेयं आकर्षक दिसण्यासाठी ग्लासवर देखील छोट्याशा छत्रीने जागा पटकावली आहे. ईजिप्त, निनेव्ह, पर्सेपलिस इत्यादींमधील जुन्या धर्मग्रंथांत छत्रधारी व्यक्तींच्या आकृत्या आढळतात. फार पूर्वी ईजिप्त, ॲसिरिया इ. देशांतील गुलाम आपल्या मालकाच्या डोक्यावर सावलीसाठी धरीत असलेल्या आच्छादनासारख्या वस्तूतून छत्रीचा उदय झाला असावा.सामर्थ्य व सार्वभौमत्वचे छत्र हे एक प्रतीक आहे.राजे महाराजांसाठीही डोक्यावर धरण्यासाठी छत्र वापरले जाई.छत्रधारी,छत्रपती अशी बिरुदावली यामुळे निर्माण झाली.अशी ही महत्वाची छत्री. आता छत्रीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वयंचलित,समुद्रकिनारा, फोल्डींग, बबल,सरळ,मुलांसाठी,क्लासिक, कॉकटेल,डिजिटल,फॅशन गोल्फ, टोपी, उलटा,पेपर, अंगण व वादळ असे छत्र्यांचे प्रकार आहेत.छत्र्या आता ऑटोमॅटिक झाल्या आहेत.काळ्या रंगापासुन आता छान आकर्षक रंग आणि हवी तशी प्रिंटेड नक्षीच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहे.काही कंपन्या जाहिरातीसाठीही छत्रीचा वापर करत आहेत.अशा छत्र्या फूकट वाटल्या जात आहेत अथवा उत्पादन खरेदीवर मोफत दिल्या जात आहेत.राजकीय पक्षांकडूनही छत्री वाटप केले जात आहे.पाण्याचे थेंब किंवा पाऊस पडल्यावर रंग बदलणारी छत्री सध्या ट्रेंडमध्ये आहे.ही छत्री तीन फोल्डमध्ये असून तिचा आकारही मोठा आहे. त्यावर फ्रॅब्रिक प्रिंट असून त्यावर पाण्याचे थेंब किंवा पाऊस पडल्यावर याचा रंग बदलतो. रंग बदलल्यानंतर त्यावरील नक्षी दिसते. या छत्रीची किंमत 800 रुपये आहे.बाजारात 200 रुपयांपासुन छत्र्यांच्या किंमती आहेत.फ्लाँवर प्रिंट,एम्ब्राँयडरी,इंद्रधनुष्य रंगी,बाटलीच्या आकारातील,ठिबक्याच्या असे अनेक रंगरुपाच्या छत्र्यांनी बाजारपेठ व्यापलेली आहे.काळनुसार बदलत गेलेल्या छत्रीची बाजारात आजही जादू कायम असल्याचे दिसत आहे. पावसापासून संरक्षण करण्याकरिता छत्रीचा उपयोग प्रथम फ्रान्समध्ये सोळाव्या शतकात करण्यात आला.1709 पासून ख-या अर्थाने छत्र्या बनवण्यात येत होत्या. छत्री बाळगणे सोपे जावे म्हणून फोल्डिंग छत्रीचा शोध लागला.या शोधाने छत्री व्यवसायात क्रांती झाली. फोल्डिंग छत्री खुपच लोकप्रिय झाली आहे. .
............

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

व्हेटीव्हर ग्रासची लागवड दरडग्रस्त गावांसाठी ठरू शकते वरदान

 व्हेटीव्हर ग्रासची लागवड दरडग्रस्त गावांसाठी ठरू शकते वरदान

सुनील पाटकर 



मुसळधार पाऊस सुरू झाला की डोंगरातील माती आपली जागा सोडते.आणि मग भूस्खलन आणि दरडी कोसळण्यासारख्या घटना घडतात. हजारोंचे बळी घेणारी ही दरड थांबवता येणे शक्य्य आहे का असा प्रश्न मनात घर करू लागतो. होय दरडी कोसळणे थांबविण्याचेे काम एक  साधे गवत करूू शकते. विश्वास बसत नाही ना .या गवताचेेेे नाव आहे व्हेटीव्हर ग्रास , मराठीत याला चक्क वाळा किंवा खस म्हणून ओळखले जाते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पाण्यात आपण जो वाळा टाकतो तेच हे गवत. अगदी शुल्लक असणारे हे गवत दरडीपासून हजारोंचेेे जीव वाचवू शकते.

काही दिवसांपूर्वी इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याने शेकडोजण दरडीखाली  गाडले गेले आहेत. तसेच यापूर्वी महाड तालुक्यात  पारमाची, दासगाव ,कोंडीवते ,जुई ,रोहन व तळीये या गावांवर दरड कोसळून शेकडो जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे दरड कोसळणे व भूस्खलनाचा प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा आहे. आता यावर प्रभावीपणे उपाय करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

देशातील घडणाऱ्या अशा विविध घटनांमुळे NIDM ( National Institue of Disasater Management) मधील प्राध्यापकांनी यामागील कारणे शोधली. दरड कोसळणे थोपविण्यासाठी जमिनीची मशागत करून व्हेटीव्हर ग्रास  ची लागवड केल्यास प्रतिबंध होऊ शकतो असे मत व्यक्त त्यांनी केले होते. त्यामुळे अशा दरडी कोसळण्याच्या संभाव्य शक्यता असलेल्या जागी जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण अत्यंत गरजेचे असते हे पुढे आले.पहिला पाऊस पडला की  पावसानंतर लगेचच मातीत गवत उगवते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. अशा ठिकाणी व्हेटीव्हर ग्रासची लागवड वरदान ठरणार आहे.व्हेटीव्हर ग्रास ची लागवड केल्यास  दरडी कोसळण्याला आळा घालता येऊ शकतो. भारतात २०१३ मध्ये कोईमतूर नेहरू आर्टस आणि सायन्स सेंटरने निलगिरी पर्वतांच्या भागातील जमीनीची धूप थांबविण्यासाठी ह्याचा वापर केला होता. तसेच ह्याच प्रोजेक्ट्चा भाग म्हणून उटी-कोटगिरी हायवे वरील कोडप्पामुड , उटी- मेट्टुपलायम नॅशनल हायवे येथील मरापालम आणि कलहट्टी येथे याची गवताची लागवड केली होती. अगदी कोकण रेल्वे येथे सुध्दा दरडी कोसळून होणारे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी ह्याच  व्हेटीव्हर ग्रास चा उपयोग केला होता. भारतामध्ये शंतनु भट्टाचार्य या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी मुळे होणारे भूस्खलन थांबविण्यासाठी याचा प्रथम प्रयोग करून त्याबाबतचा फोटो प्रबंध सादर केला आहे. हा उपाय यशस्वी झाल्यानंतर 2014 मध्ये आसाम मधील गुवाहाटी येथे मोठी दरड कोसळल्यानंतर या ठिकाणी  व्हेटीव्हर ग्रास लावण्याचा प्रकल्प  शंतनु भट्टाचार्य ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाला.इतकेच नव्हे तर डॉ.पाऊल त्रूओंग  Director, Vetiver Network International, Brisbane, Australia ह्यांनी  व्हेटीव्हर ग्रास लावून भूस्खलन थांबविता येऊ शकते हे आपल्या फोटो प्रबंधातून सिद्ध केले आहे. त्यामुळे भारतात तसेच कोकणात वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनांवर ही उपाय योजना प्रभावी ठरू शकेल.उन्हाळ्यामुळे शरीरातील तापमान थंड राहावे यासाठी आपण वाळ्याचे सरबत अथवा थंड पाणी पितो. काही ठिकाणी उन्हाची तीव्रता रोखण्यासाठी खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावलेल्या असतात. हे गवत प्राधिक काळ टिकणारे असते ते अत्यंत चिवट व मातीला घट्ट धरून ठेवणारे असते.म्हणूनच . पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. बायोइंजिनिअरिंग मध्ये ह्या व्हेटीव्हर ग्रास  चा उपयोग फिजी, इटली, हैती, जावा , साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज इत्यादी बरेच देश भू-संधारणासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. भारतात याची प्रथम सुरुवात झाली होती. परंतु नंतर गांभीर्याने पाहिले गेले नाही. आता काही संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या गवतापासून अनेकांचे जीव वाचू शकणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अशा प्रकारची लागवड करण्याचे नियोजन तात्कालीन कार्यकारी अभियंता वसईकर यांनी केले होते. परंतुु त्याला गती मिळाली नाही. कमी खर्चामध्ये होणारी व्हेटीव्हर ग्रास लागवड दरड प्रवण क्षेत्रामध्ये अशी लागवड झाल्यास ती दरड प्रवण क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे

.................

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

रायगडकर केकच्या प्रेमात

रायगडकर पडलेत केकच्या प्रेमात,  

सुनील पाटकर

चॉकलेट ,पायनॅपल , ब्लॅक करंट यासह विविध प्रकारांच्या केकच्या प्रेमामध्ये सध्या रायगड कर पडले असून  जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांची तसेच उलाढालीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे .
केक म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते .बच्चे कंपनीला तर केक चा मोह आवरता येत नाही .वाढदिवसाला सर्रासपणे कापले जाणारे चेक आता घरोघरी वेगळ्या कारणाने व समारंभासाठी दिसू लागले आहेत. कोणत्याही प्रकारच्या निमित्तसाठी अगदी लग्न समारंभातही केक कापण्याची प्रथा आता रूढ होऊ लागली आहे.पूर्वी बेकरीच्या बरणीत कपमध्ये दिसणारा  केक आता विविध आकार व चवीत दिसू लागला आहे .या सर्वांचा परिणाम रायगड जिल्ह्यातील बाजारपेठेवर होत  आहे . गेले वर्षभरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांचे प्रमाण वाढू लागले आहे .यापूर्वी केवळ बेकरीमध्ये केक मिळत असे.परंतु आता केक ची स्वतंत्र दुकाने उघडली जात आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होऊ लागल्याने अनेक नामांकित ब्रँड रायगड कडे वळू लागले आहेत. मॉन्जीनीस , दिंशॉ इलाईट यासारख्या देशभरातील ब्रँड प्रमाणेच रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मयूर बेकरीची ही केक शॉपी जिल्ह्यात पसरत आहेत .यामुळे रायगडकर आता केकच्या प्रेमात पडलेले आहे. जिल्हयामध्ये मागील काही महिन्यात सुमारे 42 नवीन केकची दुकाने उघडली गेली आहेत. यामुळे सुमारे दोनशे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे . रायगड जिल्ह्यात 145 केकच्या दुकानातून वार्षिक सुमारे पाच ते सहा कोटीची उलाढाल होत असते . कंपन्याचे टेंपो केक घेऊन जिल्ह्यातील सर्व दुकामात रोज पुरवठा करत असतात .
वाढदिवसा साठी लागणारे मोठे मोठे केक घरी नेले जात असतातच परंतु त्यापेक्षाही या दुकानांमध्ये येऊन पेस्ट्रीज खाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. महिला वर्गामध्ये ही केकच्या क्लासेसचे ही वाढलेले आहेत . अनेक महिला घरी केक बनवून सोशल मीडियावर त्याचे छायाचित्र प्रकाशित करून आपल्या केक ची विक्री करत असतात . अशा महिलानाही ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे .
काही दुकानदार एक तासा मध्ये आपल्या नावा सहीत केक तयार करून देत असतात केकच्या या बाजारपेठेत मोठा केक .कप केक,पेस्ट्रिज , डोनट्स, मफीन्स याचे 100 हून अधिक केकचे प्रकार उपलब्ध आहेत.
.........
केकचे प्रकार तरी किती ?
मँगो .व्हॅनिला ,चॉकलेट,मावा, पायनापल,स्ट्रॉबेरी, अलमौण्ड,ओरँज, बनाना,कोकोनट, रसमलाई,लिची, पिस्ता,मिक्सफ्रूट,,गनाश,ट्रफल,रेड वेल्वेट चीज क्रीम,पिनाकोलाडा, .केशर ,फालुदा,रोजफालुदा,पिस्ताफालुदा,मोजीतो 
 मन्गोंमलाई,ब्लूबेरी, वेरीबेरी,रबडी, मैंगोग्रीन, वेलची,बटरस्कॉच, कालाखाट्टा, पाइन अॅपल, रूहअफ्जा,चेरी, ब्लैककरंट,रेडरोज, रम, पानमसाला, ब्लैकफ़ोरेस्ट, व्हाइटफ़ोरेस्ट
,,,,,,,,

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

काशिद बीच

रोहा - मुरुड रस्त्यावर असणारा  काशिदचा समुद्रकिनारा गोव्यामधील समुद्रकिना-यांची आठवण करून देतो. रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण तर आहेच परंतु एक अप्रतिम आणि भेट द्यायला हवा असा हा  समुद्रकिनारा आहे. विकएंडला पर्यटकांची इथे समुद्रस्नानासाठी झुंबड असते.पार्किगसाठीही जागा नसते त्यामुळे विकएंड अथवा सुट्टी हंगाम सोडून इथे येणे चांगले.या ठिकाणी घोडागाडी,उंटावरिल सफर ,किनार्‍यावरील झोपाळे असल्याने बच्चे कंपनी खुष होऊन जाते तर तरूणांसाठी वाँटर स्कुटर आहेत.चांगली सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद समुद्रकिनारा पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.काशिदच्या किनार्‍यासमोर सुरुचे सुंदर बनही आहे.मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांच्या शूटींगसाठी हा  समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे.या किना-यावर वेळ कसा जातो हे कळतही नाही आणि तोंडातून नकळत शब्द बाहेर पडतात,बीच असावा तर असा !
बीच असावा तर असा !




घोडागाडी

वाँटर स्कुटर 

सुरुचे  बन

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

एकदा केंव्हा तरी




एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,

आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणा-या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥

                         -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं


मी तिला विचारलं 



मी तिला विचारलं,

तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?

त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..

मी तिला विचारल,

तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,

इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,

तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं


मी तिला विचारलं,

तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,

संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?



मी तिला विचारलं,

तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं..

..... मंगेश पाडगांवकर

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

गांधीवादाची शोकांतिका

गांधीवादाची शोकांतिका 
राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान नसेल तर योग्य काय, अयोग्य काय; न्याय्य काय, अन्याय्य काय; नैतिक काय, अनैतिक काय; यांचा निर्णय करता येणार नाही. राजकारणाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अप्रस्तुत आहेत, असे काही व्यवहारवादी हल्ली मानतात. सत्तास्पर्धा एवढेच राजकारणाचे स्वरूप त्यांना समजते. परंतु केवळ सत्तास्पर्धेत टिकून राहण्याकरतासुद्धा राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान असावे लागते. तत्त्वशून्य, दिशाहीन, सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ मान्य करीत नाही. निव्वळ छक्क्य़ापंजांचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित राहता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. त्याचा निरास होण्यास फार काळ लागणार नाही. हेच महात्मा गांधींनी आपल्या आचरणातून आणि तत्त्वज्ञानातून सांगितले आहे. आणि त्याचाच आज आपल्याला पार विसर पडला आहे.
महात्मा गांधींच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना अनेकांनी त्यांना अनेक नावांनी संबोधले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हटले. मला वाटते, सर्व संबोधनांत हे संबोधन अधिक सार्थ आहे. महात्मा गांधींनी खऱ्याखुऱ्या अर्थाने भारताची राष्ट्रीय घडण केली. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीकरता त्यांनी देशव्यापी चळवळ उभारली आणि शेवटपर्यंत तिचे नेतृत्व केले. त्याकरता आवश्यक ते राजकारणी व्यवहारकौशल्य त्यांच्यापाशी होते. परंतु तेवढय़ाने ‘राष्ट्रपिता’ या संबोधनास ते पात्र झाले नसते. कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती हा राष्ट्रीय घडणीचा केवळ एक भाग आहे. निव्वळ व्यवहारकुशल राजकारणाने कदाचित स्वातंत्र्यप्राप्ती झाली असती, परंतु राष्ट्रनिर्मिती झाली नसती. राष्ट्राची घडण करावयाची तर राजकारणाला राजकीय तत्त्वज्ञानाची जोड द्यावी लागते, हे त्यांनी आरंभीच ओळखले आणि प्रथमपासूनच आपल्या राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान दिले. असे तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचवावयाचे तर त्याला थोडाबहुत आचारधर्म चिकटवावा लागतो. महात्मा गांधी हे एक अत्यंत कुशल समाजधुरीण असल्याने त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाला जनमनाची पकड घेईल असा आचारधर्म चिकटवला आणि शिस्तबद्ध राजकीय संघटना उभी करण्यास आवश्यक म्हणून या आचारधर्माचा आग्रह धरला. दुर्दैवाने महात्मा गांधींच्या काही अनुयायांना एवढा आचारधर्मच काय तो समजला. असा आचारधर्म स्थल-काल-परिस्थितीसापेक्ष असतो आणि असावयास हवा, हेही ते विसरले. दैनंदिन सामाजिक व राजकीय व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी जशी महात्मा गांधींवर होती, तशी या अनुयायांवर नव्हती. त्यामुळे खुद्द महात्मा गांधींनाही परवडणार नाही असा आचारधर्माचा आग्रह त्यांनी धरला. ‘गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी’ म्हणून त्यांना कोणी म्हटले तर ‘आपले काही चुकत तर नाही ना?’ असा विचार करण्याऐवजी त्यांना स्वत:चे कौतुकच वाटू लागले. या मंडळींनी गांधीवादाच्या नावाखाली एक नवीन कर्मकांडाचे स्तोम माजविले. कर्मकांडाच्या खोडय़ात स्वत:ला आणि गांधीवादाला अडकवून घेऊन सारा व्यवहारच अशक्यप्राय केला. स्वत:चे हसे करून घेतले आणि गांधीवाद अव्यवहार्य ठरविला.
या एकांतिक गांधीवाद्यांच्या दुसऱ्या टोकाला स्वत:ला ‘बुद्धिवादी’ म्हणवून घेणारी काही मंडळी होती. राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे, ही गोष्टच मुळात या मंडळींच्या बुद्धीला गम्य झाली नाही. याचे कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीव्यतिरिक्त राष्ट्रउभारणीचे काही कार्य आहे, हेच त्यांना उमगले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपुरते बोलावयाचे तर तेही त्यांच्यासारखे दहा-वीस बुद्धिमान आपल्या राजकीय कौशल्याने इंग्रजांपासून मिळवू शकतील अशी त्यांची मनोमन खात्री होती. ही मंडळी सर्व दृष्टींनी बुद्धिमान असली तरी जनमानसासंबंधीचे त्यांचे अज्ञान आश्चर्यकारक होते. राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती आणि नवराष्ट्र उभारणीच्या या साऱ्या खटाटोपात जनताजनार्दन आणि जनमानस यांचा संबंध काय, याचेच आकलन त्यांना कधी झाले नाही. साहजिकच महात्मा गांधींच्या सर्वस्पर्शी, धुरंदर राजकीय नेतृत्वापुढे ही मंडळी हतप्रभ झाली.
महात्मा गांधींच्या पश्चात राष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा पंडित जवाहरलाल नेहरूंकडे आली. पंडित नेहरू बुद्धिवादी असले तरी त्यांना जनमानसाची पूर्ण ओळख होती. राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे, हा गांधीवादाचा आशय त्यांनी जाणला होता. त्यामुळे त्यांनीही आपल्या राजकारणाला विरोधी वा विसंगत नाही, परंतु तरीही स्वतंत्र अशा राजकीय तत्त्वज्ञानाची जोड दिली आणि राष्ट्रउभारणीचे कार्य चालू राहिले.
पंडित नेहरूंच्या पश्चात आज पुनश्च याविषयी बुद्धिभ्रंश झालेला दिसतो. भारताच्या राष्ट्रउभारणीचे कार्य अजून अपुरे आहे. ते आणखी काही पिढय़ा चालू ठेवल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय जीवन निर्वेध होणार नाही, सामाजिक व राजकीय नेत्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे, इत्यादी गोष्टींचा आज विसर पडला आहे. साहजिकच राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही आणि त्याची गरजही वाटेनाशी झाली आहे. किंबहुना सर्व तात्त्विक व नैतिक विचारांची ‘पुस्तकी’ म्हणून अवहेलना करावी आणि तत्त्वशून्य राजकारणाचा ‘व्यवहारवाद’ म्हणून उदोउदो करावा, अशी प्रथा पडत आहे. एकांतिक गांधीवाद्यांनी एकेकाळी माजविलेल्या कर्मकांडाच्या स्तोमाची ही प्रतिक्रिया आहे.
म्हणूनच राजकारण, समाजकारण किंबहुना सर्व मानवी व्यवहार यांना काहीतरी तात्त्विक वा नैतिक अधिष्ठान हवे, हा जो गांधीवादाचा आशय आहे, त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. तात्त्विक अधिष्ठान म्हणजे तत्त्वज्ञानाची लोखंडी चौकट नव्हे. राजकारण, समाजकारण हे बोलून-चालून मानवी व्यवहार आहेत. त्यात वावरावयाचे तर व्यावहारिक तारतम्याचे स्वातंत्र्य हवे. परंतु म्हणून योग्य काय, अयोग्य काय; न्याय्य काय, अन्याय्य काय; नैतिक काय, अनैतिक काय; यासंबंधीचा निर्णय करणे सुटत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. हे निर्णय सुसंगतपणे करावयाचे तर कुठल्यातरी तात्त्विक, नैतिक निकषांची गरज भासते. उपमाच द्यावयाची तर संगीतातील षड्जाची देता येईल. संगीतात षड्जाला जे महत्त्व आहे, तेच राजकारणात, समाजकारणात तात्त्विक वा नैतिक अधिष्ठानाला आहे. कलाकार त्याच्या आंतरिक स्वरात मिळेल तो षड्ज स्वीकारतो. त्यावर आपली बैठक स्थिर करतो. एवढे केले म्हणजे कोणताही राग कोणत्याही ढंगाने गाण्यास तो मोकळा असतो. मात्र, स्वीकारलेला षड्ज त्याला सोडता येत नाही. षड्ज सुटला तर कलाकार काय गातो, ते त्याचे त्यालाही कळणार नाही. तो भरकटत जाईल. सूर आणि बेसूर यांचा निर्णय करता येणार नाही. किंबहुना संगीत संगीतच राहणार नाही. तीच गोष्ट राजकारणाची आहे. राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान नसेल तर योग्य काय, अयोग्य काय; न्याय्य काय, अन्याय्य काय; नैतिक काय, अनैतिक काय; यांचा निर्णय करता येणार नाही.. राजकारणाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अप्रस्तुत आहेत, असे काही व्यवहारवादी मानतात. सत्तास्पर्धा एवढेच राजकारणाचे स्वरूप त्यांना समजते. त्यांना एवढेच सांगावयाचे की, केवळ सत्तास्पर्धेत टिकून राहण्याकरतासुद्धा राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान असावे लागते. तत्त्वशून्य, दिशाहीन, सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ मान्य करीत नाही. निव्वळ छक्क्य़ापंजांचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित राहता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. त्याचा निरास होण्यास फार काळ लागणार नाही.
विशाल मानवतावाद आणि त्याच्याशी सुसंगत अशी स्वनिष्ठा हे गांधीवादाचे षड्ज-पंचम आहेत. विशाल मानवतावादाने महात्मा गांधींनी आपल्या राजकारणास आवश्यक ते नैतिक अधिष्ठान दिले. स्वाभिमान व स्वनिष्ठेची तार छेडून त्यांनी राष्ट्रजागृतीचा मंत्र दिला. महात्मा गांधी उभे राहिले आणि भारत उभा राहिला. त्याकरिता राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक विकास यांचीही वाट पाहावी लागली नाही. राजकीय पारतंत्र्यात आणि आर्थिक दारिद्रय़ातही देशाला मानवतावादाच्या नैतिक अधिष्ठानावर स्वाभिमानाने आणि स्वनिष्ठेने मान ताठ करून उभे राहणे शक्य आहे, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणाने सिद्ध करून दाखविले.
गरीब माणसाने स्वाभिमानाने जगावयाचे तर दारिद्रय़ाबरोबर येणारे सर्व न्यूनगंड सोडून दिले पाहिजेत आणि आपले अंथरुण पाहून पाय पसरण्यास शिकले पाहिजे. श्रीमंत माणसाचा सहवास घडला म्हणजे गरीब माणसाला आपल्या अन्न-वस्त्राबद्दल साहजिकच कमीपणा वाटतो आणि तो श्रीमंत अन्न-वस्त्राचे नसते नाटक करू पाहतो. असल्या न्यूनगंडाने श्रीमंती येत नाही. मात्र, स्वाभिमान नष्ट होतो आणि अंती अपमान पदरी येतो. महात्मा गांधींनी देशाला क्षणार्धात या न्यूनगंडापासून मुक्त केले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपले अन्न-वस्त्र पुरे-अपुरे असेल तसे स्वाभिमानाने वापरण्यास शिकविले. गांधीवाद्यांनी त्याचा मथितार्थ बाजूस ठेवला आणि या साध्या व्यवहारी स्वाभिमानी शिकवणीचा अर्थ केला, की माणसाने आपल्या भौतिक गरजाच शक्य तितक्या कमी केल्या पाहिजेत, हीच गांधीवादाची शिकवण आहे. त्यातून काही प्रामाणिक कर्मकांड आणि पुष्कळशी भोंदूगिरी निर्माण झाली.
स्वाभिमानाबरोबरच महात्मा गांधींनी देशाला स्वनिष्ठेची शिकवण दिली. स्वनिष्ठा म्हणजे आम्ही आमच्यापाशी आहेत त्या साधनांनिशी स्वत:च्या पायावर उभे राहू आणि एक एक पाऊल पुढे टाकू, हा विश्वास! स्वावलंबनाने, स्वनिष्ठेने मनुष्य अंतर्मुख होतो. आपण आपल्यापाशी असलेल्या सर्व साहित्याचा, साधनांचा पूर्ण उपयोग करून घेत आहोत का, हा प्रश्न सतत विचारीत राहतो. याउलट, परावलंबनाचे आहे. परावलंबी मनुष्य बहिर्मुख असतो. कोणाच्यातरी साहाय्याखेरीज आपण आपल्या पायावर उभे राहूच शकत नाही अशीच मनाची धारणा असली म्हणजे मनुष्य स्वत:चे सामथ्र्य, साहित्य व साधने यांचा विचारच करीत नाही. आधुनिकता, अद्ययावतता यांनी दिपून गेल्यामुळे त्याला आपल्यापाशी असलेले साहित्य व साधने निरुपयोगी वाटतात आणि तो अधिकाधिक परावलंबी बनतो.
आपणापाशी असलेल्या साहित्य-साधनांचा पूर्ण उपयोग म्हणजे स्वनिष्ठा. तिचे प्रतीक म्हणून महात्मा गांधींनी सूतकताईचा कार्यक्रम सांगितला. परंतु गांधीवाद्यांनी त्याचाही मथितार्थ बाजूस ठेवून त्याचे कर्मकांड केले आणि त्यात सोवळेओवळे आणले. आहेत त्या साधनांवर निष्ठा म्हणजे नवीन साधने निषिद्ध असे ठरवले आणि आर्थिक प्राप्ती तत्त्वत:च अशक्य केली.
स्वाभिमान व स्वनिष्ठा या गांधीवादाच्या मूळतत्त्वांचा अशा रीतीने गांधीवाद्यांनी विपर्यास केल्यामुळे स्वत:स बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या गांधीवादाच्या टीकाकारांना साहजिकच फावले. गांधीवादाने गरीब माणसास स्वाभिमानाने जगण्यास शिकवले. बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की, गांधीवादास दारिद्रय़ मंजूर आहे. गांधीवाद हा तत्त्वत:च संपन्न जीवनाच्या विरोधी आहे. गांधीवादाने गरीब माणसास असेल त्या साहित्यनिशी कामास प्रवृत्त केले. बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की, गांधीवादाचा नवीन साधनास आणि पर्यायाने विज्ञानासच विरोध आहे. तात्पर्य, गांधीवाद हा भौतिक व आर्थिक प्रगतीस विरोधी व मारक आहे असे बुद्धिवाद्यांनी ठरविले.
सध्या व्यवहारवादाचा अंमल जारी आहे. व्यवहारवादाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठानाचे तर वावडे आहेच; परंतु साधा स्वाभिमानही आर्थिक विकासाच्या आड येतो. स्वाभिमान, वस्तुनिष्ठा याऐवजी मतलब व स्वार्थ याच आर्थिक विकासाच्या प्रेरणा आहेत असे व्यवहारवाद्यांनी ठरविलेले दिसते. त्यामुळे व्यवहारवादाचाच एक भाग म्हणून गांधीवादाचे केवळ ढोंग राहिले आहे. बाकी गांधीवादातील स्वाभिमान व स्वनिष्ठेचा विसर पडलेला आहे. आज देश स्वतंत्र असला तरी स्वातंत्र्यरक्षणास अपरिहार्य अशा समजुतीने, देश आर्थिकदृष्टय़ा पूर्वीपेक्षा सुस्थितीत असतानाही अधिक आर्थिक विकासास अवश्य आहे अशा समजुतीने, व्यवहारवादी राजकीय व सामाजिक नेते आणि राज्यकर्ते जगभर लाचारपणे, दीनवाणेपणे भीक मागत हिंडत आहेत. जेमतेम २५-३० वर्षांपूर्वीच परतंत्र, पराधीन आणि पराभूत बनलेले स्वतंत्र भारताचे नेते- ही दोन चित्रे शेजारी शेजारी ठेवून बघण्याजोगी आहेत.
राज्यकर्त्यांनी अंगीकारलेले हे परावलंबी धोरण देशात खोलवर रुजले आहे. कोठे काही फुकट मिळते का, हे शोधत राज्यकर्ते जगभर भीक मागत हिंडत आहेत आणि सरकारकडून काही फुकट पदरात पाडून घेता येते का, याचा शोध घेत देशातील नागरिक धावाधाव करीत आहेत. याला म्हणतात ‘कल्याणकारी शासन’! आपण बाहेर भीक मागावी आणि देशात लोकांना भीक मागण्यास शिकवावे, असा हा सत्तेवर राहण्याचा सोपा मार्ग सापडला आहे. मग स्वाभिमान व स्वनिष्ठेची आठवण कोणास होणार?
ही अधोगती थांबवायची असेल तर राष्ट्रकारणास मानवतावादाचे अधिष्ठान दिले पाहिजे आणि राष्ट्रउभारणीकरता स्वाभिमान व स्वनिष्ठेचा मंत्र जागृत ठेवला पाहिजे. गांधीवादाची ही त्रिसूत्री आहे. तिचे प्रतिबिंब दैनंदिन व्यवहारात पडू शकेल असा एक सर्वव्यापी, सर्वस्पर्शी कार्यक्रमही महात्मा गांधींनी सांगितला आहे. तो आजही उपयोगी पडण्यासारखा आहे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आणि मलमूत्र, शेणकाडी इत्यादी त्याज्य वस्तूंचा संपूर्ण उपयोग हा तो कार्यक्रम होय. केवळ वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेने गरीब जीवनही कितीतरी प्रसन्न करणे शक्य आहे. केवळ स्वच्छतेने नव्वद टक्के रोगराई नष्ट होईल. त्याकरता कोणाच्याही मदतीची गरज नाही. स्वच्छता ही ज्याने त्याने आपल्या घरात आणि गावात करण्याची गोष्ट आहे. पण म्हणूनच ती आम्हास नको वाटते. औषधाने भागते, मग रोजची उठण्या-बसण्याची स्वच्छता कशाला? आज औषधपाण्याचा, दवाखान्यांचा प्रसार झाला आहे. परंतु वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेत फारसा फरक पडलेला दिसत नाही. सार्वजनिक आरोग्य सुधारलेले दिसते ते औषधाने; स्वच्छतेने नाही. प्रत्येकाला आपल्या गावात दवाखाना हवा. परंतु गावातील दरुगधी नाहीशी करण्यास कोणी तयार नाही. मलमूत्र, शेणकाडी इ. वस्तू नीट गोळा करून त्यांचा सेंद्रिय खताकरता उपयोग केला तर गावातील दरुगधी जाईल, रोगराई नष्ट होईल आणि शिवाय शेतीच्या उत्पादनास हातभार लागेल. हे करण्याकरता कोणाची मदत लागत नाही. हे आपले आपण करावयाचे आहे. भूमीतून आपण जो सत्त्वांश घेतो, तो भूमीस परत करावयाचा आहे. तसे केले तर हीच भूमी आपणास अधिक आधार देईल.  इतके हे साधे तत्त्व आहे. मग हे आपण का करीत नाही? कारण स्वावलंबन, स्वाभिमान, स्वनिष्ठा यासंबंधी लोकशिक्षण व लोकजागृती करण्यापेक्षा परकीयांकडून रासायनिक खते भीक मागून आणणे सरकारला सोपे वाटते आणि मलमूत्र, शेणकाडी यांचा रोजचा व्यवहार करण्यापेक्षा सल्फेटचे पोते उघडून टाकणे शेतकऱ्यास सोईचे वाटते. हे आज सुखकर वाटणारे परावलंबन परिणामी आत्मघाती ठरल्याखेरीज राहणार नाही, हीच गांधीवादाची मुख्य शिकवण आहे.
स्वाभिमान, स्वनिष्ठा आणि त्यांचे प्रतिबिंब दैनंदिन जीवनात पडू शकेल असा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी कार्यक्रम हाच गांधीवादाचा आशय आहे. त्याचे आज पुनरुत्थान झाले पाहिजे.    
(‘गांधी नावाचे महात्मा’ या 
आगामी पुस्तकातून) 
संपादक : रॉय किणीकर,  
साहाय्यक : अनिल किणीकर
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
दैनंदिन सामाजिक व राजकीय व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी जशी महात्मा गांधींवर होती, तशी त्यांच्या अनुयायांवर नव्हती. त्यामुळे खुद्द महात्मा गांधींनाही परवडणार नाही असा आचारधर्माचा आग्रह त्यांनी धरला. ‘गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी’ म्हणून त्यांना कोणी म्हटले तर ‘आपले काही चुकत तर नाही ना?’ असा विचार करण्याऐवजी त्यांना स्वत:चे कौतुकच वाटू लागले. या मंडळींनी गांधीवादाच्या नावाखाली एक नवीन कर्मकांडाचे स्तोम माजविले. कर्मकांडाच्या खोडय़ात स्वत:ला आणि गांधीवादाला अडकवून घेऊन सारा व्यवहारच अशक्यप्राय केला. स्वत:चे हसे करून घेतले आणि गांधीवाद अव्यवहार्य ठरविला.
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आणि मलमूत्र, शेणकाडी इत्यादी त्याज्य वस्तूंचा संपूर्ण उपयोग करण्याचा कार्यक्रम गांधीजींनी दिला. केवळ स्वच्छतेनेच नव्वद टक्के रोगराई नष्ट होईल. स्वच्छता ही ज्याने त्याने आपल्या घरात आणि गावात करण्याची गोष्ट आहे. पण म्हणूनच ती आम्हास नको वाटते. औषधाने भागते, मग रोजची उठण्या-बसण्याची स्वच्छता हवी कशाला? आज सार्वजनिक आरोग्य सुधारलेले दिसते ते औषधाने; स्वच्छतेने नाही. प्रत्येकाला आपल्या गावात दवाखाना हवा. परंतु गावातील दरुगधी नाहीशी करण्यास कोणी तयार नाही.
भारताच्या राष्ट्रउभारणीचे कार्य अजून अपुरे आहे. ते आणखी काही पिढय़ा चालू ठेवल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय जीवन निर्वेध होणार नाही, सामाजिक व राजकीय नेत्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे, या गोष्टींचा आज विसर पडला आहे. साहजिकच राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही आणि त्याची त्यांना गरजही वाटेनाशी झाली आहे. किंबहुना सर्व तात्त्विक व नैतिक विचारांची ‘पुस्तकी’ म्हणून अवहेलना करावी आणि तत्त्वशून्य राजकारणाचा ‘व्यवहारवाद’ म्हणून उदोउदो करावा अशी प्रथा पडत आहे.
अर्थतज्ज्ञ डॉ. वि. म. दांडेकर यांनी केलेली गांधीवादाची मीमांसा.. लोकसत्ता २९ जानेवारी २०१२