सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

स्वाईन फ्लु

स्वाईन फ्लु आजाराने भल्याभल्यांची तारांबळ उडविली ,बघावे तिकडे तोंडावर मास्क ,रुमाल नाहितर फडकं बांधलेले अनेक जण दिसू लागले.स्वाईन फ्लु आजाराने पळणारे आम्ही.. तसे समाजात वावरतांना अनेक वेळा मास्क बांधूनच वावरत असल्याची जाणीव यावेळी मात्र प्रकर्षाने झाली.शाळेतील फि वाढ असू दे नाहितर वाढलेली तुरडाळ असू दे.सरकारी कार्यालयात दाखल्यासाठी १०० रु.हातावर टेकतानाही आम्ही तोंडावर मास्क बांधलेला असतोच की !.भारनियमन होऊनही आम्ही विजेसाठी जादा दर मोजायचे, ६ वा वेतन आयोग आम्हाला नसला तरी महागाई आम्ही सोसायची.उच्च शिक्षणासाठी लाखों रुपये डोनेशन देताना आपल्या तोंडावर आणि डोळ्यावर मास्क हा असतो.रेशनचे कुणाच्यातरी वाट्याचे धान्य काळ्याबाजारात विकताना डोळ्यांना दिसते पण बोलणार कसे ? तोंडावर मास्क ! हा मास्क ही बाजारात जादा भावाने घेताना कुणी काहिच बोलत नाही कारण त्यांच्या तोंडावर अगोदरच एक मास्क आहे. तोंडावर मास्क ,कानात ईअर फोन नाहितर कानाला चिकटलेला मोबाईल, डोळ्यावर गाँगल .मरणाच्या भितीने आपण पळतोय खरे पण अश्या कितीतरी व्ह्यायरसने आपलं जीवन या अगोदरच ग्रासून टाकलं आहे याची साधी जाणिव आपल्याला आहे का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा