सोमवार, २० डिसेंबर, २०१०

ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही

शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे
प्राथमिक शाळा


.वापरात नसलेली  बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे
विद्यार्थी
.
महाड तालुक्यातील पारवाडी-आदिवासी वाडीवरील हे चित्र ..असे चित्र असल्यावर शाळेला चाललो आम्ही असे मुले आवडीने म्हणतील का ?.पारवाडी-आदिवासी वाडी येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत.येथील विद्यार्थ्यांची नावे पारवाडी येथील शाळेत दाखल करण्यात आली होती.परंतु ही शाळा या लहान विद्यार्थ्यांसाठी दूर असल्यांने आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेत गळती होत असे,शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी या साठी जिल्हापरिषदेने पारवाडी-आदिवासी वाडीवर नवी शाळा सुरु केली.
दरवाज्यावर लिहिलेले शाळेचे नाव  


पहिली-दुसरीच्या वर्गात सध्या ३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यांना शिकविण्यासाठी चांगला पगार असणारे २ शिक्षक आहेत.जिल्हापरिषदेने  नवी शाळा सुरु केली पण  पुढे काय ? आज या मुलांची अक्षरश: चेष्टाच चालविली आहे.वाडीवर बचत गटाची वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड आहे ,शेडमध्ये गुरांची विष्ठा पडलेली ,अत्यंत अस्वच्छता अशा वातावरणात विद्यार्थ्यांना अध्यापन कसे मिळणार ?.शिकण्याचा फळा तुतलेला आहे.तो भिंतीला टेकून ठेवलेला दिसला.नविन आणावा..जुना दुरुस्त करावा अशी मानसिकता चांगला पगार घेणा-या येथील शिक्षकांची नाही
तुटलेला फळा
.
शेडची केव्हांही पडेल अशी भिंत आहे त्यावर पाढे ,अद्याक्षरे,महिने लिहिलेले आहेत.नव्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर नसल्याने शाळेला इमारत नाही.शाळेबाबत एवढी अनास्था आहे कि २०० रु .सधा नामफलकही शाळेला नाही.शेडच्या जून्या गंजलेल्या दरवाज्यावर  खडूने शाळेचे नाव लिहिलेले आहे.करोडो रुपयांचे डिजिटल बोर्ड आपल्या वाढदिवसाला लावाणा-या लोकप्रतिनिधींना ही बाब लक्षात येऊ नये हे दुर्दैव !.शाळेत साधे कपाट नाही.शाळेतील सर्व मुले आदिवासी त्यांची नावे शिधापत्रींकावर नाहीत त्यामुळे त्यांना आदिवासी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही.स्थलांतरामुळे उपस्थितीही कमी आहे.
भिंतीवरील अद्याक्षरे


शासन प्रत्येक सरकारी शाळांना अनुदान देते.नामफलक,फळा ई.खर्च यातून सहज भागवता येतो परंतु येथे तसे दिसत नाही.शिक्षण विषयक माहितीपत्रके ,भित्तिपत्रके शाळेत लावलेली नाहीत विद्यार्थी आहेत पण इमारत नाही...शिक्षक आहेत पण शाळेविषयी आसक्ती नाही अशी स्थिती या शाळेची आहे.एका बाजूला ए.सी. तर दुसरीकडे शी.शी.. एका बाजूला टोलेजंगी इमारती तर दुसरीकडे पडीक बकरी शेड.  २१ व्या शतकाकडे जाणा-या आपल्या देशाला हे चित्र शोभनीय नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा