सोमवार, २० डिसेंबर, २०१०

ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही

शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे
प्राथमिक शाळा


.वापरात नसलेली  बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे
विद्यार्थी
.
महाड तालुक्यातील पारवाडी-आदिवासी वाडीवरील हे चित्र ..असे चित्र असल्यावर शाळेला चाललो आम्ही असे मुले आवडीने म्हणतील का ?.पारवाडी-आदिवासी वाडी येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत.येथील विद्यार्थ्यांची नावे पारवाडी येथील शाळेत दाखल करण्यात आली होती.परंतु ही शाळा या लहान विद्यार्थ्यांसाठी दूर असल्यांने आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेत गळती होत असे,शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी या साठी जिल्हापरिषदेने पारवाडी-आदिवासी वाडीवर नवी शाळा सुरु केली.
दरवाज्यावर लिहिलेले शाळेचे नाव  


पहिली-दुसरीच्या वर्गात सध्या ३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यांना शिकविण्यासाठी चांगला पगार असणारे २ शिक्षक आहेत.जिल्हापरिषदेने  नवी शाळा सुरु केली पण  पुढे काय ? आज या मुलांची अक्षरश: चेष्टाच चालविली आहे.वाडीवर बचत गटाची वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड आहे ,शेडमध्ये गुरांची विष्ठा पडलेली ,अत्यंत अस्वच्छता अशा वातावरणात विद्यार्थ्यांना अध्यापन कसे मिळणार ?.शिकण्याचा फळा तुतलेला आहे.तो भिंतीला टेकून ठेवलेला दिसला.नविन आणावा..जुना दुरुस्त करावा अशी मानसिकता चांगला पगार घेणा-या येथील शिक्षकांची नाही
तुटलेला फळा
.
शेडची केव्हांही पडेल अशी भिंत आहे त्यावर पाढे ,अद्याक्षरे,महिने लिहिलेले आहेत.नव्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर नसल्याने शाळेला इमारत नाही.शाळेबाबत एवढी अनास्था आहे कि २०० रु .सधा नामफलकही शाळेला नाही.शेडच्या जून्या गंजलेल्या दरवाज्यावर  खडूने शाळेचे नाव लिहिलेले आहे.करोडो रुपयांचे डिजिटल बोर्ड आपल्या वाढदिवसाला लावाणा-या लोकप्रतिनिधींना ही बाब लक्षात येऊ नये हे दुर्दैव !.शाळेत साधे कपाट नाही.शाळेतील सर्व मुले आदिवासी त्यांची नावे शिधापत्रींकावर नाहीत त्यामुळे त्यांना आदिवासी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही.स्थलांतरामुळे उपस्थितीही कमी आहे.
भिंतीवरील अद्याक्षरे


शासन प्रत्येक सरकारी शाळांना अनुदान देते.नामफलक,फळा ई.खर्च यातून सहज भागवता येतो परंतु येथे तसे दिसत नाही.शिक्षण विषयक माहितीपत्रके ,भित्तिपत्रके शाळेत लावलेली नाहीत विद्यार्थी आहेत पण इमारत नाही...शिक्षक आहेत पण शाळेविषयी आसक्ती नाही अशी स्थिती या शाळेची आहे.एका बाजूला ए.सी. तर दुसरीकडे शी.शी.. एका बाजूला टोलेजंगी इमारती तर दुसरीकडे पडीक बकरी शेड.  २१ व्या शतकाकडे जाणा-या आपल्या देशाला हे चित्र शोभनीय नाही.

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

प्रगतीच्या वाटेवर -अशीही एक आदिवासीवाडी

प्रगतीच्या वाटेवर -अशीही एक आदिवासीवाडी

आदिवासींची अतिशय चांगली घरे 
आदिवासी समाज म्हटला कि व्यसनांध ...अज्ञानी ..अंधश्रध्दाळू अशी अनेक बिरुदावली त्यांच्या मागे लावली जातात,सरकारने कितीहि योजना यांच्या्साठी राबविल्या तरी हा समाज सुधारणार नाही अशी धारणा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनीही करून घेतलेली आहे .परंतु हा समज खोटा ठरवत सर्वांपुढे आदर्श ठेवलाय तो एकलव्य आदिवासीवाडीने .


रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील लाटवण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही आदिवासीवाडी येते.रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या या एकलव्य आदिवासीवाडीने प्रगतीच्या वाटेवर आदिवासी समाजही मागे नाही हे दाखवून दिले आहे.येथिल आदिवासींची घरे ,स्त्री ,पुरुष व मुलांचे राहणीमान ,त्यांचे आर्थिक व सामाजिक योगदान, शिक्षणाविषयीची आस्था सारे काही वाखाणण्याजोगे आहे.
महाड -दापोली मार्गावर लाटवण गावाजवळ ही वाडी आहे,वाडीवर आदिवासी समाजाची २८ घरे आहेत. आदिवासींची घरे म्हणजे झोपडी ,कुडामेढीची ..परंतु .येथिल आदिवासींची घरे इतरांच्या घरांसारखी आहेत.जांभा दगड वापरून उत्तम बांधकाम केलेली घरे . दारे-खिडक्या असलेली ,स्वच्छ सारवलेली अंगणे ,अतिशय चांगली घरे या वाडीवर पहावयाला मिळतात.बहुसंख्य आदिवासीच्या घरी टि.व्ही आहेत.घरावर डिश अँटिना आहेत.फोन आहेत.बहुसंख्य आदिवासीना घरकुल योजनेचा लाभही मिळालेला आहे.सर्व गृह्पयोगी वस्तुंनी सजलेली घरे यथील आर्थिक स्तर दाखवितात .याचे मुळ कारण म्हणजे कामावलेला पैस गुंतविणे.जुनी मंडळी सोडली तर वाडीवर व्यसनाचे प्रमाण नगण्य आहे. अनेकांची बँकेत खाती आहेत,मासेमारी ,लाकूड्तोड ,बागकाम व मोलमजूरी हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय त्यांनी जोपासला आहे.काही जण गवंडीकाम शिकले असल्यांने घरे बांधून देण्याची कामेही ते करतात.त्यामुळे त्यांच्या हाती पैसा आला आहे.वाडीवर दोघांकडे मोटारसायकलही आहेत.
 एकलव्य आदिवासीवाडी
एकलव्य वाडीवर आदिवासी वस्ती ७०-८० वर्षांपासून आहे.स्थानिक मंडळ घरटी २० रु.काढून बचत करतात.अडीनडीला हा पैसा वापरला जातो.वाडीवर ५० लहानमोठी मुले आहेत.परंतु सर्व शाळेत जातात.येथील शैक्षणिक स्तरही उंचावत आहे.संदीप घोगरेकर हा तरूण नुकताच डि.एड झाला आहे तर मोहन जाधव हा महाविद्यालयात शिकत आहे.अन्य मुले आश्रमशाळेत शिकतात.वाडीचा स्वतंत्र क्रिकेट संघ आहे , ४ जानेवारीला डोंगरदेवीची पूजा व उत्सव सर्व समाज एकत्र साजरा करतो.स्त्रीया पाचवारी साडी नेसतात.एका महिलेने सरपंचपदही भुषविले आहे.आदिवासीं मधील हा बदल वाखाणण्याजोगा आहे.आदिवासी समाज इतर समाजा बरोबर प्रगतीच्या वाटेवर येतोय याचे उत्तम उदाहरण म्हणून एकलव्य आदिवासीवाडीकडे पाहता येईल.

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

गाण्याचा पत्ता लिहून घ्या

गाणं कोठे असतं ?
फूलपाखरू फुलावरी बसतं,
गाणं तिथे असतं !

तान्हुल्या बाळासारखं
उगीच आपलं मन हसतं
गाणं तिथे असतं !

दातओठ खाऊन कधी गाणं मिळत नाही,
हावरं हावरं धावून कधी गाणं मिळत नाही !

गाणं कुठे मिळतं ?

टपटप थेंब जिथे फुलं होतात,
हिरवी पानं खेळवणारी मुलं होतात,
झाडांच्या मुळांकडे
कोवळं पाणी वळतं
गाणं तिथे मिळतं !

माझं नसतं,
तुझं नसतं,
पाठीवरचं ओझं नसतं !

मन जेव्हा मोरासारखं आनंदाने
नाचत नाचत झुलू लागतं
आपण काहिच करीत नाही
गाणं तेव्हा आपोआप फुलू लागतं !

   मंगेश पाडगावकर

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी

अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार व होतकरू तरुण-तरुणींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुक्त विद्यापीठ व तंत्रशास्त्र शिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

अल्पसंख्याक समाजाला  या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल. तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात; तसेच राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत विविध तांत्रिक अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे अल्पसंख्याक विद्यार्थी; तसेच सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. 31 मार्च 2011 पर्यंत जे विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची यादी त्या त्या संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवायची आहे. योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन, जैन, शीख व पारशी या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.

विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणाअल्पसंख्याक समाजातील बेरोजगार व होतकरू तरुण-तरुणींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुक्त विद्यापीठ व तंत्रशास्त्र शिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात; तसेच राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत विविध तांत्रिक अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे अल्पसंख्याक विद्यार्थी; तसेच सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. 31 मार्च 2011 पर्यंत जे विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची यादी त्या त्या संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवायची आहे. योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन, जैन, शीख व पारशी या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.

विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली प्रशिक्षण शुल्काची रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सरकारकडून दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. विद्यार्थ्यांची निवड तंत्रशास्त्र संचालनालय करणार आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सरकारी आयटीआयमधून अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याकरताही सरकार अनुदान देणार आहे. यासाठी मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कीममधून शिकणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. प्रशिक्षण शुल्क तसेच परीक्षा फी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीड हजार रुपये व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार रुपये किमतीचे टुल किट दिले जाईल विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली प्रशिक्षण शुल्काची रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सरकारकडून दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. विद्यार्थ्यांची निवड तंत्रशास्त्र संचालनालय करणार आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सरकारी आयटीआयमधून अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याकरताही सरकार अनुदान देणार आहे. यासाठी मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कीममधून शिकणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. प्रशिक्षण शुल्क तसेच परीक्षा फी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीड हजार रुपये व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार रुपये किमतीचे टुल किट दिले जाईल